सांगली : बहुजननामा ऑनलाईन – करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी इस्लामपुरमध्ये आजपासून १० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर घेतलेल्या निर्णयानुसार त्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
सांगली जिल्ह्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर सर्वाधिक असल्याचे नुकतेच स्पष्ट झालेले आहे. करोनाच्या साथीची सुरुवात झाली तेव्हा अनेक रुग्ण सापडलेल्या इस्लामपूरमध्ये मध्यंतरी करोनाचा संसर्ग नियंत्रणात होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये करोनाचा संसर्गचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळेच तिथे पुन्हा जनता कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू होता. आज त्याबाबत निर्णय घेण्यात आला.