बहुजननामा ऑनलाईन- बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. यानंतर आता राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. याआधी मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. भाजपाकडून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर यावरून टीका सुरू होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला चांगलंच सुनावलं आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं उदात्त कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना साष्टांग दंडवत. अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
या प्रकरणी बोलताना रोहित पवार म्हणाले, “सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांत सिंहला न्याय मिळाला पाहिजे अशी आमचीही इच्छा आहे. या प्रकरणी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर विश्वार आहे.”
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 19, 2020
रोहित पवार असंही म्हणाले की, “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात न्यायालयानं कोणताही दोष नसल्याचं स्पष्ट केलं हे बरं झालं. परंतु या निमित्तानं बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं उदात्त कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना साष्टांग दंडवत” असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे.