नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत आपण अमित शहा यांना दिल्लीच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. पण शहा यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
जनतेत जाण्यासाठी शहा तयार नसून जनतेच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यायची नाहीत. हे त्रासदायक आहे. गीतेत लिहिले आहे की, मैदान सोडून कधीचीच पळू नका. एक खरा हिंदू शेर असून तो मैदान सोडून पळत नाही. अमित शहा यांनी असे मैदान सोडून पळत आहेत, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केजरिवला हे ‘आप’च्या कार्यालयात माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच फक्त शहा यांनाच नाही तर पूर्ण भाजपलाच लक्ष्य केले आहे. त्यांनी भाजपचे हिंदुत्व खोटे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्यांना हनुमान चाळीस म्हणावी लागते, त्यावर त्यांना प्रश्न केल्यावर त्यांनी भाजपच्या सर्व नेत्यांकडून हनुमान चालीसा म्हणवून घेणार असल्याचे म्हटले.