बहुजननामा ऑनलाइन टीम – KBC- 12 च्या सेटवर एक अशी महिला स्पर्धक(kbc-contestant) आली होती जिने आपल्या क्यूट अंदाजाने सर्वांची मने जिंकली. अमिताभ बच्चनही (amitabh-bachchan) या स्पर्धकावर खूश दिसले. पण जेव्हा ही स्पर्धक म्हणाली, की ते एका गोष्टीवरून अमिताभ बच्चन यांच्यावर नाराज आहे तर अमिताभ यांचीही उत्सुकता वाढली. स्पर्धक म्हणाली, की शाहरूख खान (shahrukh-khan) हा तिचा फेव्हरेट अभिनेता आहे आणि जेव्हा अमिताभ यांनी शाहरूखला मोहब्बतें चित्रपटामध्ये रागावलं होते तेव्हा तिला फारच वाईट वाटले होते.
यावर अमिताभ बच्चन हे त्यांच्या शैलीत विविध गोष्टी सांगतात; पण स्पर्धक काही ऐकायला तयार होत नाही. उलट बच्चन म्हणतात, की मी नाही तर शाहरूखनेच मला सिनेमात रागावले होते. पण दिल्लीहून आलेली स्पर्धक रेखा राणीने बिग बी यांचे काहीच ऐकले नाही. नंतर स्पर्धक म्हणते, की ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये तर तुम्ही शाहरूख खानला घरातून बाहेर काढले होते. मी तेव्हा फार लहान होते आणि खूप रडले होते. अमिताभ पुन्हा सांगतात, की त्यांना असे करण्यासाठी स्क्रीप्ट रायटरने सांगितले होते.
शाहरूखला माफी मागण्यास तयार
अखेर बच्चन म्हणतात, की त्यांना दु:ख आहे की, त्यांनी रेखा राणी यांचे मन दुखवले. ते हात जोडून शाहरूख खानला माफी मागतात आणि जेव्हाही ते शाहरूखला भेटतील तेव्हा त्यालाही यासाठी माफी मागतील. तेव्हा कुठे स्पर्धक रेखा राणी खूश झाली. रेखा राणी यांचे जीवन फार गरिबीत गेले आहे. तिचे वडील रिक्षा चालवतात. रेखाला केबीसीच्या सेटवरून खूप जास्त रक्कम जिंकायची आहे.