छत्तीसगढ : वृत्तसंस्था – छत्तीसगढमधील कवर्धा जिल्ह्यात एक वेगळेच लग्न पाहायला मिळाले असून ७३ वर्षाचा वर आणि ६७ वर्षाची वधू यांचा विवाह सोहळा पार पडला. तेही सात फेरे घेतल्याशिवाय लग्न केले. ५० वर्षांपूर्वी इच्छा होती ती मुलाने पूर्ण केली. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करत मुलाने हिंदू पद्धतीने ज्येष्ठ दांपत्याचा विवाह सोहळा केला असून शेकडो लोकं या सोहळ्याचे साक्षीदार होते. सुकल निषाद वय ७३ वर्ष आणि कवर्धा जिल्ह्यातील खैरझीती गावात राहणाऱ्या गौतरहिंबाई निषाद यांचे १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला प्रेम विवाह झाला असताना त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी असून त्यांचेही लग्न झाले आहे.
सुकाल राम यांचे लग्न पद्धतशीरपणे झाले नसल्याने त्यांना वाईट वाटले होते. गावात अशी चर्चा होती की, मृत्यूनंतर त्यांना मोक्ष मिळणार नाही. म्हणूनच गावात चालू असलेल्या नवधा रामायण साइटवरील ग्रामस्थ आणि कुटूंबाच्या सहमतीने त्यांच्या वरमाळेचा कार्यक्रम झाला. तेल हळद लावत पूर्ण पारंपरिक पद्धतीने लग्नाचे आयोजन केले होते.
ही प्रेमकथा पन्नास वर्षांपूर्वी सुरू झाली असताना सुकाल राम आपल्या मित्रासाठी मुलगी पाहायला म्हणून बेमेत्रा जिल्ह्यातील बीरसिंघी येतेच गेले होते. मुलीची बहीण गौतारहीन निषाद होती. तीच सुकाल यांना आवडली होती. पण त्यावेळी सुकालच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. पण नंतर सुकालने गौतारहीनला पत्नी म्हणून न विचारता घरी आणले. सुकाल राम यांचा मुलगा धन्नू निषादने लग्न केल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही, असे म्हटले. गावकऱ्यांच्या सल्ल्याने कुटुंबाच्या इच्छेनुसार लग्न आयोजित केले असताना प्रत्येकाने या लग्नात भाग घेतला.