बहुजननामा ऑनलाईन – कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर कंगना रनौतनं गुरुवारी मुंबईतील आपलं कार्यालय तपासलं. आता तिचं पहिलं ट्विट समोर आलं आहे. ट्विटमध्ये काश्मीरचे डॉ. अग्निशेखर तिला आशीर्वाद देत आहेत.
https://twitter.com/KanganaTeam/status/1304019254786703361
उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारा एक व्हिडिओ कंगनाने बुधवारी शेअर केला होता, ज्यात तिने आता काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवणार असल्याचं सांगितलं. याबद्दल तिला डॉ.अग्निशेखर यांचं सहकार्य मिळालं आहे. कंगना आपल्या ट्विटमध्ये लिहिलं कि, ‘हर हर महादेव.’
व्हिडिओमध्ये डॉक्टर अग्निशेखर असे म्हणत आहेत की काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवण्याच्या कंगनाच्या निर्णयाचे स्वागत आहे. त्याचबरोबर काश्मिरी पंडितांच्या वतीने ते त्यांना आशीर्वादही देत आहेत. ते म्हणाले की, ते शक्य होईल तितका कंगनाला पाठिंबा देतील.
काश्मिरी पंडितांसाठी कोणीही आवाज उठविला नाही, असे सांगत अग्निशेखर म्हणतात की, या प्रकरणात कंगनाला काश्मिरी पंडितांचे काय झाले हे जाणून वाईट वाटले आहे आणि आता ती यावर एक चित्रपट बनवेल, अग्निशेखर आणि इतर काश्मिरी पंडित तिचं स्वागत करत आहेत. कंगनाच्या संकल्पातून ते भावनिक झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
बुधवारी बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली, त्यानंतर तिने उद्धव ठाकरे यांच्या नावाने व्हिडिओ बनविला. यात तिने म्हटले आहे की काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं हे आता तिला कळलं आहे आणि म्हणूनच काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवणार आहे. काही चाहत्यांनी कंगनाच्या या गोष्टीवर पाठिंबा दर्शविला आहे.
खटल्याची सुनावणी पुढे ढकलली
कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीविरोधात याचिका दाखल केली होती. यानंतर गुरुवारी या खटल्याची सुनावणी झाली आणि कोर्टाने या प्रकरणात 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. सुनावणी होईपर्यंत कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड होणार नाही, असे कोर्टाने आदेश दिले आहेत.