नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत युद्ध न करता पीओकेला आपला हिस्सा बनवू शकतो असं वक्तव्य जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी केलं. एका कार्यक्रमात ते बोलत होते. “पीओके घेण्यासाठी सरकारमधील अनेक मंत्री पाकिस्तानवर हल्ला करण्याचं बोलत आहेत. परंतु काश्मीरमध्ये विकास करून पीओकेला भारताचा हिस्सा बनवलं जाऊ शकतं. काश्मीरमध्ये विकासाची गती एवढी तीव्र करण्याची गरज आहे की, जेणेकरून पीओकेमधील लोक भारतात सामील होण्यासाठी बंड करतील.” असं ते म्हणाले.
राज्यपाल म्हणाले, “ज्या मंत्र्यांना आंतरराष्ट्रीय विषयांवर बोलण्याची संधी मिळत नाही असे आमचे अनेक मंत्री गेल्या दहा पंधरा दिवसांत पीओकेमध्ये चाल करण्याचं बोलत आहेत. तसा विचार करत आहेत. मला असं वाटतं की, जर आपलं पुढील ध्येय पीओके असेल तर युद्धाऐवजी जम्मू काश्मीरच्या विकासाच्या आधारावर त्याला आपण मिळवू शकतो.”
https://twitter.com/ANI/
‘वर्षभरातच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर भारताला मिळेल’
सत्यपाल मलिक म्हणाले, “जर आपण जम्मू काश्मीरच्या लोकांना इज्जत देऊ शकलो, त्यांना चांगले नागरिक बनवू शकलो, मुलांचे संरक्षण करू शकलो, काश्मीरमध्ये खुशाली, वीज आणू शकलो तर मी गॅरंटी देतो की, वर्षभरातच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरही युद्ध न करता भारताला मिळेल. जर असं झालं तर पाकिस्तानचा प्रत्येक नागरिक हे म्हणू लागेल की, त्याला भारतात यायचं आहे. माझा पीओकेचा नकाशा जम्मू काश्मीरची प्रगती आहे.”
visit : Policenama.com
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर
- दम्याचा आजार आहे का? ‘ही’ पाच योगासने केली तर दमा राहिल दूर
- प्रेग्नेंसीवर ‘याचा’ होतो परिणाम! कारणे जाणून घेतली तर घेऊ शकता योग्य काळजी
- ‘या’ सामान्य आजारांकडे पुरुषांनी दुर्लक्ष करू नये, असू शकतात मोठ्या रोगांचे संकेत
- तिशीनंतर ‘बल्जिंग डिस्क’ची शक्यता,अनुष्का शर्मा सुद्धा होती त्रस्त