मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने (State Government) राज्यपालांना (Governor) आठवण करुन दिली आहे. त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. जयंत पाटील (Jayant Patil) सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सातारामध्ये पत्रकारांनी जयंत पाटील यांना 12 आमदारांच्या नियुक्तीबाबात प्रश्न विचारला होता. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. देशात आणि राज्यात आमदारांच्या (MLA) नियुक्त्या रखडवून ठेवण्याचा आशाप्रकारचा अनुभव कधी आला नाही. राज्य सरकारने एखादी शिफारस केल्यानंतर इतक्या प्रचंड प्रलंबाने त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. इतका विलंब का लागतोय असाही प्रश्न त्यांनी केला.
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण; 163 जणांना डिस्चार्ज
जयंत पाटील पुढे म्हणाले, आमच्या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन पाठवली आहे. परंतु प्रलंबित नियुक्त्या (Pending appointment) राज्यपाल यांच्याकडून रखडल्या आहेत. राज्य सरकारचा शिफारशी करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला निर्णय न घेतल्यामुळे अधिकाऱावर गदा येतेय का ? हा खरा प्रश्न आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
Web Title : jayant patil how much the ideal governor agrees to delay the appointment of 12 mlas
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update