नवी दिल्ली : जम्मू – काश्मीर चे कलमं ३७० हटविल्याने पाकिस्तान आता संपूर्णपणे एकटा पडला आहे. भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेल्या पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारून घेतली आहे. भारताबरोबरचे सगळे व्यवहार पाकिस्तान ने बंद केले आहे. परंतु व्यापाराच्या दृष्टीने पाकिस्तान हा भारतावर जास्त अवलंबुन असतो. तसेच पाकिस्तान ने काही काळासाठी हवाई वाहतूक देखील बंद केली आहे. त्यात आता समझोता एक्सप्रेस देखील थांबवली आहे.
पाकिस्ताने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान आता भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने ह्या विषयी आंतराष्ट्रीय पातळीवर मदत देखील मागितली आहे. परंतु अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही. भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानला सौदी आणि इतर मुस्लिम देशांनीही पाठ दाखवली आहे. एवढेच काय पाकिस्तान चा मित्र पक्ष चीन ने देखील काहीच भूमिका दर्शविली नाही. अमेरिकेने पाकिस्तानला नजर ठेऊन असल्याचा इशारा दिला आहे. तसेच दहशतवाद्यांना समर्थन देऊ नका , अन्यथा वाईट परिणाम होतील ,अशी धमकी देखील दिली आहे.
पाकिस्तान कडून भारत -पाकिस्तान ला जोडणारी समझोता एक्सप्रेस देखील थांबवण्यात आली आहे. भारताने कलम ३७० हटविण्याच्या विरुद्ध हा निर्णय घेतल्याचे म्हंटले आहे, तसेच पाकिस्तानच्या सिव्हिल अॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे भारताला हवाई वाहतूक बंद करत असल्याची नोटीस देखील दाखवण्यात आली आहे. ६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत हे वाहतूक बंद असणार असल्याची माहिती त्यात देण्यात आली आहे. इम्रान खान याने भारताविरुद्ध पोकळ धमक्या देत , सीमेवर सैन्य तैनात केले आहे.