नवी दिल्ली बहुजननामा ऑनलाईन – जम्मू काश्मीर आणि लदाखचे भाऊ बहिण अनेक अधिकारांपासून वंचित होते. सरदार वल्लभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शामप्रसाद मुखर्जी आणि प्रत्येक देशभक्ताचे जे स्वप्न होते. ते पुर्ण झाले आहे. आता देशात यापुढे सर्वांचे समान अधिकार असतील. त्यासाठी मी देशवासियांचे अभिनंदन करतो. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधताना म्हणाले.
देशात आर्टीकल ३७० आणि ३५ ए ने देशाला फुटीरतावाद दिला. दहशतवाद तेथे फोफावला. काही लोकांच्या भावना भडकविण्यासाठी पाकिस्तानकडून शस्त्राप्रमाणे वापर केला जात होता. गेल्या तीन वर्षात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. कलम ३७० रद्द करण्यामुळे जम्मू काश्मीर आणि लदाख च्या लोकांचे जीवन चांगले होईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कायदा तयार करताना संसदेत मोठी चर्चा होते. बाहेर चर्चा होते. त्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जातात. य़ा प्रक्रियेतून कायदे बनतात. संसदेत कायदा तयार होतो. परंतु तो देशातील सर्व भागांना लागूच नसायचा. मात्र यापुर्वीचे सत्ताधारी कायदा करून वाहवाही लुटत होते. देशातील इतर राज्यांच्या मुलांना जे हक्क होते. ते जम्मू काश्मीरच्या मुलांना मिळत नव्हते. ते वंचित होते. देशात अन्य राज्यांमध्ये सफाई कामगारांना लागू असलेले कायदे लागू होते. मात्र तो जम्मू काश्मीर मध्ये लागू नव्हता. असे अनेक उदाहरणे त्यांनी दिली. तर आता ते कायदे तेथील मुलांना लागू होतील असे मोदी म्हणाले. देशातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू असलेले कायदे, फायदे जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हते. ते आता लागू होतील. केंद्रशासित प्रदेशातील कर्मचाऱ्यांना जे फायदे लागू होते. ते आता लागू करण्याबाबत रिव्ह्यू घेऊन करण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले.