मुंबई बहुजननामा ऑनलाईन – देशात लोकसभा निवडणूक सुरु आहे आणि राजकीय नेते एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत . नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवर टीका केली होती त्यावरून राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मोदींवर निशाणा साधला आहे ते म्हणाले कि आकस ,सातत्याने खोटे बोलणे, सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचे भान नसणे; या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकिर्द ओळखली जात होती. परंतु यात आता विधीशून्यतेची भर पडली आहे. राजीव गांधी यांच्याबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून मोदी यांच्यावर केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी प्रतापगड आणि बस्ती येथील प्रचार सभेमध्ये काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली. ‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो. पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही, असे मोदी म्हणाले होते. दरम्यान, यावर राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे ‘लढाई संपलेली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहतंय,’ असे ट्विट राहुल यांनी केले होते.
आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही.#RajivGandhi
— Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2019