बहुजननामा ऑनलाईन टीम – देशातील एका मोठ्या आरोग्य तज्ञांनी भारत कोरोना व्हायरसचे पुढचे सर्वात प्रमुख केंद्र बनू शकते, अशी शंका व्यक्त केली आहे. म्हणजे चीन, इटली, इराणनंतर भारतात हे संक्रमण जास्त प्रभावी होऊ शकते. कारण भारतात जी तयारी आहे, याबाबत बाकीच्या आशियाई देशांच्या तुलनेत कमी आणि अपर्याप्त आहे. ही शंका डॉक्टर टी. जैकब जॉन यांनी व्यक्त केली असून ते इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च सेंटरच्या एडवान्सड रिसर्च इन वायरोलॉजी सेंटरचे माजी प्रमुख होते. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे हवामान आणि जनसंख्या या व्हायरसला पसरवण्यासाठी पुष्कळ आहे. कारण लोकं उपचारापासून आणि क्वारंटाइनपासून बचाव करत पळून जात आहेत.
ते म्हणाले की, प्रत्येक आठवड्याला एक मोठे हिमस्खलन बनत आहे जे कधीही भारतावर पडू शकते. भारतात प्रत्येक शहरात एक असा परिसर असतो जिथे लोकांच्या घरात आणि लोकांमध्ये अंतर कमी असते. या परिस्थितीत कोरोना व्हायरस पसरायचा धोका आणखी वाढतो. तसेच ते सावध करत म्हणाले की, आतापर्यंत रुग्णांची संख्या संथगतीने वाढत आहे. पण १५ एप्रिलपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० ते १५ टक्के जास्त होईल.
कारण देशात या व्हायरसबाबत उचललेली पाऊले पुरेशी नाहीत.आयसीएमआरचे विद्यमान प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी १७ मार्च २०२० ला सांगितले की, देशात ८००० कोरोनाचे नमुने तपासण्याची क्षमता आहे. पण अद्यापपर्यंत या विषाणूच्या तिसर्या टप्प्यावर पोहोचण्याची कोणतीही माहिती नाही. म्हणजेच तो पसरत नाही.