नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणामध्ये एक नवीन प्रकरण समोर आल्यानंतर भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या १४८ वर झाली आहे. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी कोरोना व्हायरसवर रोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘घोर कलायुगात आपण कोरोना व्हायरससह लढू शकत नाही. १०० वर्षात एकदा अशी महामारी येत असते.’ तसेच ते म्हणाले की, ‘कोरोना व्हायरसबाबत केवळ सरकारवर भरवसा केला जाऊ शकत नाही. सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.’
भारतात कोरोनाचे १४८ प्रकरणे
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची १४८ प्रकरणे नोंदवली गेली असून तेलंगणात नवीन प्रकरण सापडले आहे. येथे नुकताच यूकेहून परतलेला आणखी एक व्यक्ती कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. तेलंगानामध्ये आतापर्यंत कोरोनाची ६ प्रकरणे समोर आली असून त्यापैकी एक बरा होऊन घरी गेला आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत ३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १३ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.