नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे भारतात आतापर्यंत ८० पेक्षा जास्त रुग्ण सापडले असून ज्या स्तरावर भारतात व्हायरस पसरला आहे, तो या आजाराचा दुसरा स्तर आहे. भारतात जर ३० दिवसात या आजाराला थांबवण्यासाठी यश आले नाही तर तो तिसऱ्या स्तरावर जाऊ शकतो. हा खुलासा देशातील एका मोठ्या डॉक्टर आणि वैज्ञानिक बलराम भार्गव यांनी केला आहे.
दुसऱ्या स्तरावरील कोरोना व्हायरस म्हणजे आतापर्यंत त्या लोकांमध्येच व्हायरस सापडला आहे, जे कोरोना संक्रमित देशात फिरून आले आहेत. म्हणजेच हा आजार स्थानिक स्तरावर एका माणसाकडून दुसऱ्या माणसामध्ये पसरला आहे.
तिसऱ्या स्तरावर भारतात असलेल्या संक्रमित लोकांकडून दुसऱ्या लोकांमध्ये पसरला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार ही माहिती समोर आली आहे. डॉ. बलराम भार्गव हे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महानिदेशक आहेत. त्यांनी सांगितले कि सरकार प्रयत्न करत आहे कि या आजाराला दुसऱ्या स्तरावरच थांबवायचे आहे. नाहीतर तुसऱ्या स्तरावर आला तर आणखी थोडा वाढू शकतो. भारत सरकारकडे आता तिसऱ्या स्तरासह लढायला आणि त्याला थांबवायला अजून ३० दिवस बाकी आहेत.
त्यांनी हेही सांगितले कि अजूनपर्यंत हा आजार भारतात समाजात पसरला नसून जर असे झाले तर खूप अवघड होईल. हीच वेळ आहे कि पूर्ण देश आणि सगळ्या जनतेने एकत्र येऊन या आजाराशी लढण्याची वेळ आहे.
व्हायरसच्या संक्रमणात तिसऱ्या स्तरावर हा लोकांमध्ये खूप वेगाने पसरेल. यानंतर चौथा स्तर येईल, जेव्हा आजार महामारीचे रूप घेईल. परत त्यावर नियंत्रण आणणे अवघड होईल. जोपर्यंत त्यावर नियंत्रण आणू शकतो तोपर्यंत लाखो लोकं शिकार झाले असतील.
चीन आणि इटलीमध्ये कोविड १९ किंवा कोरोना विषाणू सहाव्या टप्प्यात आहे. एका दिवसात शेकडो लोकं मरत आहेत. डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोविड १९ ची लक्षणे तपासली जात आहेत.
देशात ICMR च्या १०६ व्हायरस संशोधन आणि निदान प्रयोगशाळा असून तिथे विषाणूचा अभ्यास केला जात आहे. तसेच कोरोनावरही या प्रयोगशाळांमध्ये अभ्यास सुरू आहे. डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, आमच्या १०६ प्रयोगशाळांपैकी केवळ ५१ लॅब्समध्येच चाचणी घेतली जात आहे. आमच्या ५१ प्रयोगशाळांमध्ये ४५९० नमुन्यांची चाचणी क्षमता असून आत्ता आमच्याकडे परीक्षेसाठी फक्त ६० ते ७० नमुने घेण्यात येत आहेत.