नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनने आता नवे हत्यार उपसले आहे. सायबर अॅटकद्वारे चीन भारतावर 21 जुनपासून अॅटक करण्याच्या तयारीत आहे. हा हल्ला इमेलच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांनी चीनी सायबर अॅटक वाचण्यासाठी कोणत्याही अनोळखी ईमेल वरुन आलेली अॅटचमेंट न उघडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतातील 20 लाख लोकांचे ईमेल टारगेटवर असल्याची माहिती मिळत आहे. खासगी आणि आर्थिक ईमेल वर हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे. काही दिवासांपूर्वी ऑस्ट्रेलिया वर देखील अशाच प्रकारचा सायबर अॅटक झाला होता. गुप्तचर यंत्रणांनी या हल्ल्याची माहिती दिल्यानंतर दोन-चार वेबसाईटवर नजर ठेवली जात आहे. माहितीनुसार, चीन हॅकर्स या सायबर हल्ल्याच्या तयारीला लागले आहे.
यासंदर्भात सायबर एक्सपर्ट पवन दुग्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इशार्याला दुर्लक्षित करू नका. जर तुम्हाला अनोळखी संदेश आला, ज्यात एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले असेल तर असे करू नका. तुम्हाला एखादा मेल आला, ज्यात एखादी अॅटचमेंट असेल तर ती डाऊनलोड करू नका. कोरोना संकट काळात असे सायबर हल्ले वाढल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सायबर सुरक्षेबद्दल आपण जागरुक राहणे गरजेचे आहे. याला आपल्या जीवनशैलीचा भाग करुन घ्यायला हवे.