बहुजननामा ऑनलाइन टीम –
देशाच्या अनेक भागात मंगळवारपासून अगदी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, दक्षिण आणि कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतील काही भागात 2 आणि 3 सप्टेंबरला खूप जास्त पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर पश्चिम राजस्थानमधील अनेक भागात 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे.
Rainfall intensity over peninsular India is very likely to increase from 1st September. South Interior Karnataka, Kerala & Tamil Nadu very likely to receive isolated heavy to very heavy rainfall on 2nd & 3rd September: India Meteorological Department (IMD) pic.twitter.com/SWWlfLkkEs
— ANI (@ANI) August 31, 2020
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुजरातमध्ये कच्छ भागात आज मुसळधार पाऊस पडेल. पुढील दोन-तीन दिवसांत ईशान्य भारत आणि पश्चिम हिमालयीन भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे देशाच्या बर्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. पाऊस आणि पुरामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 11 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. नर्मदा नदीत जास्त पाणी वाढल्याने मध्य प्रदेश आणि गुजरातमधील अनेक भागांमध्ये पूर आला आहे, तर हिरकूड धरणातून पाणी जास्त वाढल्याने ओडिशाच्या अनेक भागात पूर आला आहे.
ऑगस्टमध्ये तुटला पावसाचा 44 वर्षांचा विक्रम
यावर्षी ऑगस्ट महिन्यात देशात विक्रमी पाऊस पडला. हवामानशास्त्रीय माहितीनुसार, यावर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाने गेल्या 44 वर्षातील विक्रम तोडला आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात 1976 मध्ये इतका पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात यावर्षी 25 टक्के जास्त पाऊस झाला. 44 वर्षांपूर्वी देशभरात 28.4% जास्त पाऊस झाला होता. यावर्षी भारताच्या दक्षिण आणि मध्य भागात जोरदार पाऊस झाला.