बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानची अर्थव्यवस्था इतकी खालावली आहे की आता त्यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाच्या विजेचे बील भरायलाही पैसे नाहीत. दहशतवादाला रसद पुरविणारा पाकिस्तान आता दिवाळखोर ठरला आहे. त्यामुळे आता इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचे पैसेही ते परत करु शकत नसलेल्या पाकिस्तानला कोणीही आर्थिक मदत देण्यास तयार नाही. भारताने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने इतर देशांकडे याबाबतीत लक्ष घालण्याची विनंती केली, मात्र कोणीही त्यांना पाठिंबा दिला नाही. कोणताही देश पाठिंबा देत नसल्याने पाकिस्तानने भारताला अण्विक युद्धाची धमकी देखील दिली. पण ज्या इम्रान खान यांनी ही धमकी दिली त्यांच्याकडे स्वत:च्या कार्यालयाचे वीजेचे बिल भरण्यास देखील पैसे नाहीत.
विजबिल न भरल्याने इस्लामाबादच्या महावितरण कंपनीने पंतप्रधान कार्यालयालाची वीजजोडणी तोडण्याची नोटीस पाठवली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने ४१ लाख १३ हजार ९९२ रुपयांचे वीजेचे बील थकीत आहे तर गेल्या महिन्याचे बिल ३५ लाखांपेक्षा जास्त आले होते. त्यातच भर म्हणजे आधीच्या महिन्याचे ५ लाखांहून अधिक रमकमेचे बिल देखील थकीत आहे. इस्लामाबादमधील महावितरण कंपनीतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाकडून वीजेचे बिल नियमीतपणे भरले जात नाही. कधी बिल भरले जाते किंवा अनेक महिने बिलाची रक्कम थकवली जाते.
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने घेतलेल्या आक्रमक भुमिकेवर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनेही दखल घेतली नाही. अमेरिकेने देखील काश्मीचा मुद्दा धुडकावून लावला. त्यानंतर दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधांनानी आधी तर पाठोपाठ त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी देखील युद्धाची धमकी दिली. आता तर त्यांच्या रेल्वे मंत्र्यांनी युद्धाची तारीख जाहीर करुन कळसच गाठला आहे.