मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने आज (बुधवार) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 महत्वाचे निर्णय घेण्यात असून सरकारी कर्मचार्यांच्या दृष्टीने एक निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. शासकीय अधिकारी व कर्मचार्यांसाठी आता 5 दिवसांचा आठवडा करणत आला आहे. 29 फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचार्यांचा आठवडा आता 5 दिवसांचा असणार आहे.
12 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय थोडक्यात –
1. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 5 दिवसांचा आठवडा. 29 फेब्रुवारीपासून
2. इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता ‘बहुजन कल्याण विभाग’
3. बाल न्याय निधी गठीत करण्यास मान्यता. 2 कोटींची तरतूद
4. राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन