बहुजननामा ऑनलाइन टीम – दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र होऊ लागल आहे. केंद्रसरकारकडून आंदोलकांच्या मागण्यांवर कोणतीही भूमिका स्पष्ट झाली नसल्याने आजपासून शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करणार (government is discussing)आहे़ त्याचाच एक भाग म्हणजे शेतकरी संघटनांचे नेते सामूहिक उपोषण करणार आहेत़ या आंदोलनामागे चीन आणि पाकीस्तानचा हात असल्याचा दावा काहींनी केला असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी़ चिदंबरम यांनी ट्विरच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनावर आरोप करणाऱ्यांना एक प्रश्न विचारला आहे.
मंत्रियों ने कृषि कानूनों के खिलाफ प्रदर्शन करने वालों को खालिस्तानी, पाकिस्तानी और चीनी एजेंट, माओवादी और नवीनतम टुकडे टुकडे गिरोह का बताया।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) December 13, 2020
आंदोलन करणाऱ्यांना सत्ताधारी मंत्र्यांनी खलिस्तानी, पाकीस्तान आणि चीनचे एजंट म्हंटले आहे. हल्ली तर त्यांचा उल्लेख हे मंत्री तुकडे तुकडे गँगमधील सदस्य असाही करताना दिसतात. जर तुम्ही असे आरोप करत आहात तर याचा अर्थ या आंदोलन कर्त्यांमध्ये एकही शेतकरी नाही़ आंदोलनात जर एकही शेतकरी नाही, तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे? असा कोंडीत पकडणारा प्रश्न पी़ चिदंबरम यांनी विचारला आहे़.
यदि आप इन सभी श्रेणियों से थक चुके हैं, तो इसका मतलब है कि हजारों प्रदर्शनकारियों के बीच कोई किसान नहीं हैं!
अगर किसान नहीं हैं, तो सरकार उनसे बात क्यों कर रही है?— P. Chidambaram (@PChidambaram_IN) December 13, 2020
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. जयपूरहून दिल्लीकडे जाणारा अखेरचा राष्ट्रीय महामार्ग शहाजहाँपूर येथे रविवारी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या हजारो शेतकºयांनी बंद करून टाकला. इतर चार महामार्ग यापूर्वीच बंद केले गेले आहेत.
देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा डाव
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा हरियाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी केला होता. देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा हा डाव आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मात्र मोदी काही कमजोर नेते नाहीत. त्यांना आता जनतेचे समर्थन मिळालेलं आहे. कृषी कायदे लागू केल्यानंतरही जनतेनं त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. शेतकरी रस्त्यावर आले तर यासंदर्भातील निर्णय संसदेत घ्यायचा की रस्त्यावर? असा सवाल देखील जे. पी. दलाल यांनी उपस्थित केला होता.