पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ग्रामीण व आदिवासी भागातील मूले आजही तंत्रज्ञानापासून दुर आहेत. त्यांच्या शिक्षणसाठी हातभार म्हणून भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देते. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेबाबत महाडीबीटी पोर्टलवर माहिती न मिळाल्यामुळे शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्या विद्यापीठाच्या कुलसचिवांना व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरून ते तत्काळ पुढे पाठवण्याच्या सूचना अनेकदा महाविद्यालयांना देण्यात आल्या असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित आहेत. त्यावर २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांची लाभाची फी मंजूर न झाल्यामुळे आर्थिक शिष्यवृत्ती न मिळाल्यास त्यास विद्यापीठ स्तरावर कुलगूरू व महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार असतील.
शिष्यवृत्ती योजनांचे लाभ वितरण सुरू झाले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोफाईल लॉगिन करून त्यांच्या अर्जांची स्थिती तपासावी. विद्यार्थ्यांना एसएमएस देखील प्राप्त होणार आहेत. विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा लाभ त्यांचे आधार लिंक असलेल्या बॅंक खात्यात देण्यात येणार आहे. विनाआधार पर्यायाचा वापर करून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी प्रोफाईल लॉगिन करून आधार क्रमांक अपडेट करून घ्यावा. अशा सूचना पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी विद्यापीठ व महाविद्यालयांना दिल्या आहेत.