मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील आगामी काळातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर (power on its own) लढणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे.
नाना पटोले हे राज्याचे प्रमुख आहेत.
आज त्यांचा वाढदिवस आहे.
आपल्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो.
पण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, स्वतंत्रपणे (power on its own) स्वबळावर लढण्याची आणि जिंकण्याची त्यालाही मी शुभेच्छा देतो.
कारण, असे स्वबळावर लढण्याचे प्रयोग प्रत्येक पक्ष करत असतो, केला पाहिजे.
त्यांनी पश्चिम बंगालमध्येही स्वबळावर लढण्याचा प्रयोग करून पाहिला.
असे प्रयोग करत राहिले पाहिजे आणि स्वबळावर काँग्रेस केंद्रात सत्तेवर येणार असेल, तर त्या सारखी ऐतिहासिक गोष्ट नाही.
जर नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाचा पराभव करण्याची ताकद स्वबळावर काँग्रेस पक्षाने निर्माण केली, तर नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू.”
नाना पटोले यांनी या अगोदरही राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचं स्थान याविषयी बोलताना सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका मांडलेली आहे.
“आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत.
आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे.
आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये.
पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा.
उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”, असं ते म्हणालेले आहेत.
… महाराष्ट्र त्यामधून बाहेर पडतो आहे – खासदार संजय राऊत
“ही चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्र अनलॉक होतो आहे आणि खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक अत्यंत सावधगिरीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हळूहळू जिल्ह्यानुसार प्रत्येक टप्प्यावर लोकांना त्रास न होता निर्बंध कसे कमी करायचे ? याची आखणी केली आहे.
त्याबद्दल खरंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं पाहिजे.
निर्बंध काळात नक्कीच जनतेला विविध कारणांमुळे त्रास होत असतो, पण आता हळूहळू महाराष्ट्र त्यामधून बाहेर पडतो आहे, ही चांगली गोष्ट आहे.”
कृपया हे देखील वाचा:
तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय सुद्धा बनवू शकता Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे पद्धत?
…म्हणून आता शिवसेना पाठीत खंजीर खुपसते, या विधानावर कोणीही विश्वास ठेवणार नाही
भारत इथेनॉलवर आधारित प्रकल्प सुरु करेल, PM मोदींनी केले पुण्यातील इथेनॉल प्रोजेक्टचे उद्घाटन
…तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही – अजित पवार