पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) भारताने (India) इथेनॉल (Ethanol) क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. इथेनॉल उत्पादन आणि वितरणाबाबत E100 पायलेट प्रोजेक्ट (E100 Pilot Project) आज (शनिवार) पुण्यात (Pune) सुरु करण्यात आले. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे व्हर्च्युअली करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले, येत्या काही वर्षामध्ये भारत इथेनॉलवर (Ethanol) आधारित कित्येक प्रकल्प सुरु करेल. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) आणि केंद्रीय पेट्रोलियम परिवहन मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) उपस्थित होते.
अब इथेनॉल, 21वीं सदी के भारत की बड़ी प्राथमिकताओं से जुड़ गया है।
इथेनॉल पर फोकस से पर्यावरण के साथ ही एक बेहतर प्रभाव किसानों के जीवन पर भी पड़ रहा है।
आज हमने पेट्रोल में 20 प्रतिशत इथेनॉल ब्लेंडिंग के लक्ष्य को 2025 तक पूरा करने का संकल्प लिया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 5, 2021
शेतकऱ्यांना मोठा फायदा
पंतप्रधान मोदी म्हणाले, मागील वर्षी ऑईल मार्केटींग (Oil Marketing) कंपन्यांनी 21 हजार कोटी रुपयांचे इथेलॉल खरेदी केले आहे.
यातील सर्वात मोठा हिस्सा हा शेतकऱ्यांना मिळाला. खासकरुन ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.
मी ज्यावेळी शेतकऱ्यांशी बोलतो त्यावेळी मला त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसतो.
ते बायो फ्युज (Bio Fuse) संबंधीत प्रणाली सहजपणे स्विकारत आहेत.
स्वच्छ ऊर्जेसाठी देशात मोठे अभियान सुरु असून याचा फायदा कृषी क्षेत्राला मिळणे स्वाभाविक आहे, असे मोदी म्हणाले.
आज विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर, भारत ने एक और बड़ा कदम उठाया है।
इथेनॉल सेक्टर के विकास के लिए एक विस्तृत रोडमैप अभी जारी हुआ है।
देशभर में इथेनॉल के उत्पादन और वितरण से जुड़ा महत्वाकांक्षी E-100 पायलट प्रोजेक्ट भी पुणे में लॉन्च किया गया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 5, 2021
मोदी सरकारचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 7 ते 8 वर्षापूर्वी भारतात इथेनॉल बाबत क्वचित चर्चा होत होती. परंतु आता भारताने इथेनॉलला 21 व्या शतकात प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पर्यावरणासोबत शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होत आहे. आम्ही 2025 मध्ये पेट्रोलमध्ये (Petrol) 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंग करण्याचा संकल्प केला आहे. 2014 पर्यंत 1 ते 1.5 टक्के इथेनॉल वापरले जात होते. सध्या 8.5 टक्के इथेनॉल मिश्रित केले जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
Addressing a programme on #WorldEnvironmentDay. #IndiasGreenFuture https://t.co/4S0pEuKcVx
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2021
इथेनॉलची खरेदी वाढली
मोदींनी सांगितले की, 2013-14 मध्ये भारताने 38 कोटी लीटर इथेनॉल खरेदी केले होते. आज हा आकडा 8 पट अधिक असून 320 कोटी लिटरवर पोहचले आहे.
उद्योगांमुळे प्रदूषण होत नाही
पंतप्रधान मोदी म्हणाले, वायू प्रदूषण फक्त उद्योगांमुळे होते हे चुकीचे आहे. किंबहूना परिवहन (Transport) डिझेल जनरेटरचा (Diesel Generator) वापर यामुळे जास्त प्रदुषण होत आहे. भारत सर्वांगीण दृष्टीकोनाने आपल्या राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमावर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृपया हे देखील वाचा:
जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय तर ‘हा’ सर्वोत्तम पर्याय, मोदी सरकार देखील करणार मदत; जाणून घ्या
…तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही – अजित पवार
… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही, दरेकरांचा सरकारला टोला
सरकारचा नवा नियम ! इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, मिळणार नवीन सुविधा