नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC- Union Public Service Commission) 2020 ने नुकतीच प्रारंभिक परीक्षेसाठी ऑधिकृत वेबसाइटवर जाऊन पूर्ण माहिती मिळवू शकता. प्रत्त्येक वर्षे या परीक्षेला लाखोंच्या संख्येत विद्यार्थी परीक्षा देतात. आज आपण बोलणार आहोत २०१८ साली यूपीएससी परीक्षा दिलेल्या श्रीधन्या सुरेश विषयी तिने ४१० वा क्रमांक मिळवून आपल्या जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
श्रीधन्या सुरेश कोणनलाइन फॉर्मची लिंक कार्यान्वित केली असून याला पूर्व परीक्षा असेही म्हणतात. ज्या उमेदवारांना परीक्षेस बसण्याची इच्छा आहे. त्यांनी अ आहे ? त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी कशी केली ? तयारी दरम्यान कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला ?
श्रीधन्या सुरेश ही केरळमधील पहिली आदिवासी मुलगी असून ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती केरळमधील सर्वात मागास जिल्हा वायनाडची आहे. ती येथील कुरिशिया जमातीची आहे. तिचे वडील रोजंदारीचे मजूर असून ते गावच्या बाजारात धनुष्यबाण विकतात, तर आई मनरेगा अंतर्गत काम करते. तिच्याबरोबर, मूलभूत सुविधांच्या अभावी तिची तीन भावंड वाढली.ती म्हणाली की त्यांच्या समाजात मुले व मुलींमध्ये फारसा भेदभाव नाही. परंतु सामान्यत: इतर आदिवासी कुटुंबांप्रमाणेच, त्यांच्या पालकांनी त्यांना कधीही रोखले नाही. तिचे कुटुंब अतिशय गरीब होते, पण तिच्या आई वडिलांनी गरिबी कधीच तिच्या शिक्षणाच्या आड येऊ दिली नाही.
प्राथमिक शिक्षण वायनाड मध्ये पूर्ण केल्यानंतर तिने कलिकत विद्यापीठातून एप्लाइड प्राणिशास्त्रात मास्टर्स केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर केरळमधील अनुसूचित जमाती विकास विभागात लिपिक म्हणून काम करण्यास तिने सुरवात केली.ती काही काळ वायनाडमधील आदिवासी वसतिगृहांची वॉर्डनही होती. एकदा श्रीधन्या सुरेशने आयएएस अधिकारी श्रीराम सांबा शिवराव यांची भेट घेतली. तेथे त्यांनी ज्या प्रकारे ‘मास एंट्री’ केली त्या प्रकारे त्यांनी तिच्यात आयएएस अधिकारी होण्याची इच्छा जागृत केली.
महाविद्यालयीन काळापासूनच तिला नागरी सेवेत रस होता, श्रीराम सांबा शिवरावांनीही त्यांना परीक्षेला बसण्यासाठी प्रेरित केले. आदिवासी कल्याण संचलित पहिल्या नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रात काही दिवस यूपीएससीचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर श्रीधन्या सुरेश तिरुवनंतपुरम येथे गेली आणि तेथे तयारी केली. यासाठी आदिवासी विभागाने त्यांना आर्थिक मदत केली. मुख्य परीक्षेसाठी तिने मुख्य विषय म्हणून मल्याळमची निवड केली. मुख्य परीक्षेनंतर जेव्हा तिचे नाव मुलाखतीच्या यादीमध्ये आले तेव्हा तिला यासाठी दिल्लीला जावे लागणार असल्याचे उघड झाले.
श्रीधन्या सांगते की , त्यावेळी केरळ ते दिल्ली असा प्रवास खर्च करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते. माझ्या मित्रांना हे कळताच त्यांनी आपापसात देणगी गोळा केली आणि चाळीस हजार रुपयांची व्यवस्था केली, त्यानंतर श्रीधन्य सुरेश दिल्लीला पोहोचू शकली . तिसर्या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले.