रायगड : बहुजननामा ऑनलाईन – भाजप सरकार पुन्हा सतेत येणार असून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आरपीआय ला मंत्रीपद आणि ५० ते ६० कार्यकर्त्यांना महामंडळावर घेणार आहेत. त्यामुळे १ किंवा २ जागेसाठी युती सोडणे योग्य नाही. अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली आहे.
रायगड जिल्ह्यात ‘चवदार तळे सत्याग्रह’ च्या निमित्ताने एका कार्यक्रमध्ये आठवले बोलत होते. बोलताना त्यांनी ‘आरपीआय’ युती सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीबाबतची आमची बोलणी झाली असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ठ केलं.
येत्या विधानसभा निवडनुकीत ‘आरपीआय’ काही जागा मिळतील. तसेच विधानपरिषदेचीही जागा मिळतील. आणि काही मंडळाचे चेअरमनपदं मिळतील यामुळे आमच्या पक्षाने विचार केला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना नरेंद्र मोदी यांना धोका देणे योग्य नसून आम्ही यांवर व्यापक विचार करूनचं निर्णय घेतला आहे. असंही आठवले म्हणाले. पण गेल्या निवडणूका मध्ये भाजपने महामंडळांच्या चेरामण पदाचे अशीच अशा दाखवून ‘आरपीआयला’ ठेंगा दाखविला होता. त्याचा विसर पक्षाला पडला आहे. असे कार्यकर्त्यांनी सांगितले.