बहुजननामा ऑनलाइन – जनतेनं आम्हाला सरकार चालवण्यासाठी पहिली पसंती दिली होती. मात्र इतर पक्षांनी बहुमताची जुळवाजुळव करून सरकार स्थापन केले. आता आमच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी आली आहे. माझा डीएनए हा विरोधी पक्षाचा आहे, त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नीट पार पाडू असा विश्वास देवेन्द्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच आमच्या मित्रपक्षाने सत्तेसाठी विरोधी पक्षाशी हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले त्यामुळे आता आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी सांभाळणार आहोत मात्र पक्षश्रेष्ठींनी ठरवलं तर मी पुन्हा येइन असे देखील फडणवीस म्हणाले.
पुन्हा निवडणुक आल्या तर त्यांना आम्ही सामोरे जायची आमची तयारी आहे. असे सूटक विधान फडणवीसांनी केले. ‘मी पुन्हा येईन असे जेव्हा मी म्हटले होते, तेव्हा तशी घोषणा माझ्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींनी ठरवले तर ‘मी पुन्हा येईन’ असे देखील फडणवीसांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी विरोधकांशी हातमिळवणी केली याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही लोकसभा सोबत लढलो त्यामुळे विधानसभेला वेगळे लढणे योग्य होणार नाही म्हणून दिल्लीतील नेतृत्वाने विधानसभा देखील युतीत लढा असे आदेश दिले होते त्याप्रमाणे आम्ही युतीत लढलो मात्र शिवसेनेने विरोधकांना सोबत घेत सत्तास्थापन केली आणि जनतेचा विश्वासघात केला अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.