मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित NDA ला घवघवीत यश मिळाले आणि काँग्रेस ,राष्ट्रवादीचे पानिपत झाले . या निकालानंतर शरद पवारांनी प्रसारमाध्यमावर ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पार्टीला महाराष्ट्रात ४ जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसला अवघी १ जागा मिळाली बारामतीचा बालेकिल्ला जरी राष्ट्रवादीला राखता आला असला तरी पार्थ पवार उभे असलेला मावळ त्यांना गमवावा लागला आहे. या पराभवाने पवारांच्या कुटुंबाने पहिल्यांदाच हार पाहिली आहे. त्यामुळेच थकलो आहे जरी, तरी अजून झुकलो नाही आणि जिंकलो नसलो तरी अजून ही हरलो नाही, अशा आशयाची ही पोस्ट पवारांनी टाकली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकीय कारकीर्द तब्बल ५० वर्षांची आहे.आतापर्यंत लढलेल्या १४ ते १५ निवडणुकीत माझा एकदाही पराभव झालेला नाही”, असं स्वत: शरद पवार म्हणाले होते परंतु पार्थ पवार यांच्या रुपाने पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली आहे.