बहुजननामा ऑनलाइन टीम –रांची : एका व्यक्तीने जेव्हा आपल्या गरोदर पत्नीला परीक्षा देण्यासाठी स्कूटी चालवून 1200 किलोमीटरचे अंतर पार केले, तेव्हा त्याची चर्चा देशभरात झाली. झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात राहणारे धनंजय यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये आपल्या पत्नीला परीक्षेला नेण्यासाठी सुमारे 1200 किलोमीटरचा प्रवास केला. धनंजय यांच्या पत्नीचे नाव सोनी आहे. 11 सप्टेंबरला तिची डि.एड. (डिप्लोमा इन एज्युकेशन) ची परीक्षा होती.
इतक्या दूर स्कुटीवरून जाणे धनंजयसाठी सोपे नव्हते, कारण त्यांची पत्नी गरोदर होती. परंतु, कोरानामुळे पत्नीची परीक्षा चुकू नये असे त्यांना वाटत होते. यामुळे त्यांनी स्कुटीवरून परीक्षा केंद्रावर जाण्याचे ठरवले.
गरोदर पत्नीसोबत स्कुटीवरून प्रवास करणे त्रासदायक होते. परीक्षा झाल्यानंतर त्यांच्या समोर सर्वात मोठे टेन्शन होते ते म्हणजे पुन्हा 1200 किलोमीटर अंतर स्कुटीवरून पार करत घरी पोहचणे. परंतु, मध्यप्रदेशात आलेल्या या जोडप्याला आता घरी जाण्यासाठी विमानाचे तिकिट देण्यात आले आहे.
न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार झारखंडच्या दाम्पत्याची कहानी मीडियामध्ये आल्यानंतर एका कॉर्पोरेट दिग्गजाने त्यांना परतीच्या प्रवासासाठी विमानाचे तिकिट दिले आहे. यासाठी दोघांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते दोघे प्रथमच विमानाचा प्रवास करत आहेत.
धनंजय यांनी सांगितले की, आम्हाला ग्वाल्हेर ते रांचीसाठी विमानाचे तिकिट मिळाले आहे. हे तिकिट 16 सप्टेंबरचे आहे. ग्वाल्हेरहून रांचीसाठी थेट उड्डाण नाही, यासाठी आम्ही हैद्राबादवरून रांचीला जाऊ. यानंतर रस्तेमार्गे गोड्डाला जाऊ. याची व्यवस्था गोड्डाच्या जिल्हाधिकार्यांनी केली आहे.
त्यांनी पुढे सांगितले, माझी स्कुटी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. तर राहण्याची व्यवस्था ग्वाल्हेर प्रशासनाने परीक्षा केंद्राच्या जवळ केली होती. ते म्हणाले, गोड्डामध्ये काही लोकांनी नोकरीची व्यवस्था करण्याबाबत सुद्धा म्हटले आहे.
त्यांची पत्नी सोनीने न्यूज एजन्सी सांगितले की, मला टिचर व्हायचे आहे. यासाठी डि.एड.ची परीक्षा दिली आहे. माझे पती आणि कुटुंबाने खुप आधार दिला आहे. सोन्याचे दागिने विकल्यानंतर आम्ही काही पैशांची व्यवस्था केली, परंतु पैसे बसने प्रवास करण्याएवढे नव्हते, ज्यामुळे आम्ही स्कुटीवरून प्रवास करत परीक्षा केंद्रात निघालो.
सोनीने सागितले, प्रवासात आम्हाला खुप त्रास सहन करावा लागला. खराब रस्ते आणि पावसामुळे खुप अडचणी आल्या. कोरोना व्हायरसमुळे अजूनही वाहतुकीची साधने अनेक ठिकाणी योग्य प्रमाणात उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करत परीक्षा केंद्रावर पोहचावे लागत आहे.