मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. यातील काही जण राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून आयात केलेले असून त्यांना थेट मंत्रिपद देण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनीही यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
एखाद्या व्यक्तींनी पक्षाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर पुन्हा निवडून यावे लागते. पुन्हा निवडून न येता विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही, तसेच आयात केलेल्या लोकांना प्राधान्य दिले जात असून भाजपामध्ये निष्ठावंतांना मागे ठेवलं जातं असल्याची टीकाही अजित पवारांनी केली.
यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देत म्हंटले आहे कि, अशा प्रकारचा कोणताही कायदा नाही, जर एखादी व्यक्ती पात्र असेल तर भारतीय राज्यघटनेने तिला मंत्री बनण्याचा अधिकार दिला आहे. संबंधित व्यक्ती कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर ६ महिने मंत्रिपदी राहू शकतो. फक्त विरोधी पक्षाचा सदस्य असताना त्याला मंत्री होता येत नसल्याचाही खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
दरम्यान, तीन आठवडे चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात निवडणूक आधीचे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असून महत्त्वाचे विधेयक ही मंजूर केले जातील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन राजकीय घडामोडीचे केंद्र बिंदू ही ठरणार आहे. धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.