मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – गृह मंत्रालयातील विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा मोठा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री उशिरा घेतला. डीएचएल चे प्रमोटर्स आणि एस बँके घोटाळ्यातील आरोपी कपील आणि धीरज वाधवान बंधू यांना लॉकडाऊनचे उल्लंघन करुन खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाण्यास वाहतुकीच्या परवानगीचे पत्र दिले होते. हे वाधवान बंधू आपल्या ५ आलिशान कार्समधून २३ कुटुंबियांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असताना गेले होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा प्रकरणाला वाचा फोडून गृहमंत्र्यांच्या सहमतीशिवाय असे पत्र कोणता अधिकारी देऊ शकणार नाही, अस आरोप केला होता.
त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अगोदर या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे जाहीर झाले. मात्र, सामान्यांना दंडुका आणि श्रीमंताचे धेंडांचे चोचले, आरोपींना थंड हवेच्या ठिकाणी फिरायला मुभा अशाी टिका सुरु झाली. त्यानंतर रात्री उशिरा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश काढला. पहाटे २ वाजता त्यांनी यासंबंधीचे ट्विट करुन माहिती दिली.
गृहमंत्रालयाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवर वाहतूकीच्या परवानगीचे पत्र आहे. ८ एप्रिल अशी त्यावर तारीखही आहे. ही मंडळी माझ्या ओळखीची असून कौटुंबिक मित्र आहेत. तातडीच्या कौटुंबिक कामासाठी त्यांना खंडाळ्याहून महाबळेश्वरला जात आहेत. त्यांना तिथे पोहोचता यावेत, यासाठी सहकार्य करावे, असे त्या पत्रात म्हटले आहे. या पत्रावरुन किरीट सोमय्या यांनी सरकारला लक्ष्य केले होते. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी गृहमंत्र्यांचीच चौकशी करावी, अशी मागणणी केली होती.
वाधवान बंधू कुटुंबियांसमवेत २३ लोकांना हा पास दिला गेला. बेलवर असणारे वाधवान यांना कसा प्रवास पास मिळतो, या संदर्भाता चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे. किरोना विषाणूशी लढताना हा सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावरुन राजकीय आरोप करण्याची संधी भाजपला मिळाली. त्यामुळे सरकारने मध्यरात्री गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला.