बंगळूरू : वृत्तसंस्था – कर्नाटचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आपल्या मुख्यमंत्री झाल्याबाबत दु:ख व्यक्त करत राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. चुकून राजकारणात आलो होतो आणि मुख्यमंत्रीदेखील चुकूनच झालो. देवाने मला दोन वेळा मुख्यमंत्री केले परंतु १४ महिने मी जनतेच्या भल्यासाठी काम केल्याचे ते म्हणाले.
एचडी कुमारस्वामी म्हणाले,’सध्याचे राजकारण हे चांगल्या लोकांसाठी नाही. ते पुर्णत: जातिव्यवस्थेवर आधारित असल्याचे माझ्या लक्षात येत आहे. आता मी पद सोडले असल्याने मला यात ओढू नये. आता मला शांतीने राहू द्यावे. कारण इथून पुढे मला राजकारणात राहण्याची अजिबातही इच्छा नाही. सत्तेत असताना मी माझ्या परीने चांगले काम केले. आता मला लोकांना शांतीने जगताना पाहायचे आहे.’
HD Kumaraswamy: I'm observing where today's politics is going. It's not for good people, it's about caste infatuation. Don't bring in my family. I'm done. Let me live in peace. I don't have to continue in politics. I did good when I was in power. I want space in people's heart. https://t.co/kbRcqOdXkA
— ANI (@ANI) August 3, 2019
कर्नाटकातील कांग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) आघाडीचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळले. दोन्ही पक्षांच्या अनेक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सरकार अल्पमताच्या संकटात आले. विरोधी पक्षांच्या जोरदार मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी घेतलेल्या मतदानात कुमारस्वामी बहुमत मिळवू शकले नाहीत. कुमारस्वामींच्या बाजूने ९९ तर विरोधात १०५ मते पडली. त्यानंतर सरकार कोसळले.
या घडामोडीनंतर कुमारस्वामी मात्र चांगल्याच नैराश्येत गेल्याचे दिसत असून राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा करत आहेत.