जळगाव : बहुजननामा ऑनलाइन– Gulabrao Patil On Load Shedding In Jalgaon | काही दिवसांपासून राज्यावर भारनियमनाचे संकट ओढवले आहे. या संकटाला मोदी सरकार (Modi Government) जबाबदार आहे.
केंद्राकडून कोळसा मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारला भारनियमन (Load Shedding In Maharashtra) करणे भाग पडले.
या भारनियमनामुळं शेतकऱ्यांचं, उद्योजकांचं जे काही नुकसान होत आहे,
त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले, दोन दिवसांपूर्वी भारनियमनाविरोधात भाजपचे खासदार उन्मेष पाटील (BJP MP Unmesh Patil)
यांनी आक्रोश मोर्चा काढला.
मात्र त्यांनी इकडे बोंब मारण्यापेक्षा कोळसा मिळावा यासाठी केंद्राकडे जर प्रयत्न केले असते तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता (Gulabrao Patil On Load Shedding In Jalgaon).
अशा शब्दात फटकारताना हा पठ्ठ्या राहिला नसता तर उन्मेष पाटील दिल्लीदरबारी गेले नसते,
असा चिमटाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला.
Web Title :- Gulabrao Patil On Load Shedding In Jalgaon | modi government is responsible for the heavy regulation taking place in the state criticizes gulabrao patil
हे देखील वाचा :
ST Workers Strike | 5 महिन्यांच्या संपामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी; 250 कोटींचे नुकसान
Pune Crime | काळेपडळचा भाई कोण ? सनी हिवाळेच्या खूनप्रकरणात तिघा सराईत गुन्हेगारांना अटक