रांची : वृत्तसंस्था – देशभरात नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी-एनआरसी लागू करण्यास सरकार वचनबद्ध आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच, ‘असा दुसरा कोणता देश आहे जो परदेशी लोकांना येथे बेकायदेशीररित्या राहू देईल ? असा प्रश्नदेखील शहा यांनी उपस्थित केला.
एनआरसी म्हणजे काय ?
नेशनल रजिस्टर ऑफ़ सिटिजन म्हणजे एक असे रजिस्टर ज्यामध्ये देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या ओळखीची एक सूची असेल. जी हे निर्धारित करेल की, देशामध्ये राहणारे खरे नागरिक कोण आहेत. त्यासंबंधीची सर्व माहिती यात समाविष्ट केली गेलेली असेल.
एखादा भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिका, ब्रिटन किंवा रशियामध्ये जाऊ शकतो ? नाही, इतर देशातील लोक ओळखपत्रांशिवाय कसे जगतात ? म्हणूनच, एनआरसीची अंमलबजावणी देशात झाली पाहिजे, असे देखील अमीत शहा यांनी सांगितले. अमित शहा पुढे म्हणाले की, ‘आम्ही आसाम नंतर संपूर्ण देशात एनआरसी लागू करू. आम्ही लवकरच नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी करू. देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांची यादी असेल. तसेही ही एनआरसी आहे, फक्त आसाम रजिस्टर ऑफ सिटिझनच नाही.’
आसाममधील एनआरसीच्या अंतिम यादीतून वगळलेल्या १९ लाख लोकांच्या निर्णयाबाबत गृहमंत्री म्हणाले की, परदेशी न्यायाधिकरण निर्णय घेईल. कारण जे लोक यापासून दूर राहिले आहेत. त्यांना परदेशी न्यायाधिकरणासमोर आपला खटला मांडण्याची संधी आहे, त्यांचा वकील घ्या. गृहमंत्री म्हणाले की, आसाम सरकारनेही अशी व्यवस्था केली आहे की, ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसे नाहीत, सरकार त्यांना आपली बाजू ठेवण्यासाठी वकील देईल. दरम्यान, या महिन्याच्या सुरूवातीस अमित शहा यांनी देशातील पूर्वोत्तर राज्यांनाही भेट दिली. या दौर्यावर शाह यांनी आश्वासन दिले की,सरकार लवकरच नागरिकता दुरुस्ती विधेयक-कॅब आणेल.