बहुजननामा ऑनलाइन टीम – जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जेजुरी जवळील रानमळा येथे विजेच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून बारा एकर ऊस (sugarcane)जळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .
रानमळा येथील दत्तात्रय तुकाराम कुदळे,भारत तुकाराम कुदळे, मनोज मच्छीन्द्र कुदळे, हरिभाऊ खैरे, मालन दत्तात्रय कुदळे, जयवंत संभाजी कुदळे यांच्या सुमारे बारा एकरातील ऊस पेटून नुकसान झाले आहे .या शेतकऱ्यांच्या शेतावरून विजेच्या तारा गेल्या आहेत.या तारा बऱ्याच खालून गेल्या आहेत. दि 5 रोजी सायंकाळच्या वेळी या तारांच्यात घर्षण होऊन ठिणग्या खाली पडल्याने उसाने पेट घेतला .त्यामुळे उसाच्या पिकाचे सुमारे 10 लाखा रुपयापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .
या शेतकऱ्यांनी सोमेश्वर साखर कारखाना तसेच विद्युत महामंडळ यांना ही माहिती दिली . साखर कारखाना व वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली आहे . असे शेतकऱ्यांनी सांगितले .