बहुजननामा ऑनलाईन टीम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे २९ मुख्यमंत्रीम्हणून शिवाजी पार्कवर शपथ घेतली. यानंतर गेल्या महिन्यांपासून चालू असलेल्या नाट्यमय घडामोडींना पुर्णविराम मिळाला. आता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहण्यासाठी उद्धव ठाकरे जातील. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा बंगला रिकामा करावा लागणार आहे. त्यासाठी फडणवीसांनी घरातील वस्तू शिफ्ट करण्यासाठी कंपन्यांची वाहने ‘वर्षा’ बंगल्यावर पोहचली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता ते मुंबईमध्ये नवीन घराच्या शोधात असल्याची माहिती मिळाली आहे.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारपासूनच ‘वर्षा’ बंगला रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. घरातील वस्तू शिफ्ट करण्यासाठी वाहने मलबार हिल येथील निवासस्थानी पोहचले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सध्या फडणवीस हे नव्या घराच्या शोधात आहे. फडणवीस यांच्या कुटुंबियांनी मुंबईत राहण्याचा विचार केला आहे. फडणवीस यांची पत्नी अमृता या अॅक्सिस बॅंकेत उच्चपदावर काम करत आहे तर त्यांची मुलगी मुबंईतील शाळेत शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरहून मुंबईत वास्तव्यात आले होते. ते नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड झाली असून, नव्या विधानसभेत त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
राज्याच कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता न आल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्याचवेळी अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करुन मुख्यमंत्रिपदाची स्थापना केली. त्याचवेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारला शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. यावर न्यायालयाने फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अखेर बहुमताअभावी फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदाचा राजानामा द्यावा लागला. अवघ्या साडेतीन दिवसातच फडणवीस सरकार कोसळले.
Visit : bahujannama.com