नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यास उशीर होत असून यावर आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशवरील सुनावणीदरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत अशा गुन्हेगारांसाठी कायद्यात बदल करण्याची मागणी केली. तसेच असे कायदेशीर डावपेच सुरु असतात. त्यामुळे लोकं हैद्राबाद एन्काऊंटर केल्याबद्दल खुश आहेत, हे सांगत निर्भया प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली.
हर बार एक नया क़ानूनी पेंच फंसाकर अपने आप को फाँसी से बचाने का प्रयास करने वाले बेटी #Nirbhaya के हत्यारे नरपिशाचों को किसी भी तरह की कोई भी छूट न देकर जल्द से जल्द फाँसी पर लटका देना चाहिए।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) January 29, 2020
जैसा कि कहा गया है कि न्याय मिलने में हुई देरी, न्याय न मिलने के बराबर है।
यही सब क़ानूनी दाँवपेंच के चलते जनता हैदराबाद में हुए एंकाउंटर पर ख़ुशियाँ मनाती है। उसको त्वरित न्याय और उचित सजा मानती है।
जनता का ये आक्रोश समाज में अराजकता पैदा कर सकता है। #Nirbhaya
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) January 29, 2020
जैसा कि कहा गया है कि न्याय मिलने में हुई देरी, न्याय न मिलने के बराबर है।
यही सब क़ानूनी दाँवपेंच के चलते जनता हैदराबाद में हुए एंकाउंटर पर ख़ुशियाँ मनाती है। उसको त्वरित न्याय और उचित सजा मानती है।
जनता का ये आक्रोश समाज में अराजकता पैदा कर सकता है। #Nirbhaya
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) January 29, 2020
तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये चार आरोपींना एका वेटनरी डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. हैद्राबादच्या प्रकरणाकरून देशात संताप व्यक्त करत होते. लोकं त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनही करत होते. त्यानंतर पोलीस आणि आरोपींमध्ये झालेल्या कथित चकमकीमध्ये पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता. जेव्हा आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले तेव्हा आरोपींचा एन्काऊंटर झाला होता.
या ठिकाणी आरोपींनी पोलिसांवर हल्ला केल्याचा कथित प्रकार घडल्यावर या चकमकीदरम्यान आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला. तर एकीकडे देशभरात हैदराबादमधील दीक्षाला न्याय दिल्याबद्दल जनतेकडून पोलिसांचे कौतुक केले जात होते. तर दुसऱ्या बाजूला मानवधिकार आयोग आणि न्यायालयाने पोलिसांच्या या कृत्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
Visit : bahujannama.com