कोलकाता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत रंगलेले भाजप आणि ममता पुराण अजून संपता संपत नाही त्यातच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशात मागील पाच वर्षे आणीबाणीपेक्षा वाईट काळ होता असे ममता बॅनर्जी यांनी म्हंटले आहे. त्यामुळे ममता यांनी एकप्रकरे पंतप्रधान मोदींवर आणि मोदींच्या कार्यकाळावर निशाणा साधला.
इंदिरा गांधी यांनी १९७५ या वर्षी आजच्याच दिवशी आणीबाणी जाहीर केली होती. त्याच गोष्टीची आठवण सांगताना ममता बॅनर्जी यांनी देशात आणीबाणीपेक्षा वाईट काळ मागील पाच वर्षे होता असे म्हटले आहे.
Today is the anniversary of the #Emergency declared in 1975. For the last five years, the country went through a ‘Super Emergency’. We must learn our lessons from history and fight to safeguard the democratic institutions in the country
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 25, 2019
ममता बॅनर्जी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी या कायमच मोदी सरकारविरोधात भूमिका घेतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते देशानं पाहिलं आहे. आपण आपल्या इतिहासातून धडे घेतले पाहिजेत. ज्यामुळे लोकशाहीच्या हितांचे रक्षण करता येणे शक्य होते.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याआधी जो शपथविधी सोहळा झाला त्यावरही ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार घातला. आता ममता बॅनर्जींनी आणीबाणीला ३६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जे ट्विट केलं आहे त्यामध्ये त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.