मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शेतकऱ्यांच्या मुलाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.त्यामुळे भाजपा पक्ष पुन्हा चर्चेत आला आहे . वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस’ असा केला आहे. ट्विट अकाउंटवर एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी हे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानावरून वाघ हे माध्यमांवर चांगलेच ट्रोल होण्याची शक्यता आहे.
एका ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी वादग्रस्त विधान केले आहे मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरील ट्विटला प्रतिउत्तर देताना वाघ यांनी शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्विटला वाघ यांनी ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…’, असे उत्तर दिले. वाघ यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. अवधूत वाघ यांनी आधीही ट्विटरवरून अशी वादग्रस्त विधाने केली आहेत.या वक्त्यव्यामुळे वाघ पुन्हा चर्चेत आले आहेत.