पंढरपूरः बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ३० टक्के उमेदवार सनातनवाद्यांशी संबंधित आहेत असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या विधानामुळे आंबेडकरांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.
सोलापूर येथून आंबेडकरांनी प्रचार सभेला सुरवात केली आहे त्यानिमित्ताने पंढरपूरमध्ये प्रचार सभा घेतली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशात आणि राज्यात ‘आरएसएस’ आणि भाजप विचाराचे सरकार यावे, अशी काँग्रेस नेत्यांची धारणा आहे, असा दावा आंबेडकरांनी केला. आजही काँग्रेस आणि सनातनवाद्यांचे साटेलोटे आहे, असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. याआधीही आंबेडकर यांनी काँग्रेस हि भाजपाची बी टीम आहे असा आरोप केला होता .