बहुजननामा ऑनलाइन टीम – हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) सध्या टीकेची धनी बनताना दिसत आहे. तिनं शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं तिच्यावर टीका केली जात आहे. काहींनी तिला पाठींबाही दिला आहे. बॉलिवूडसह अनेक इंटरनॅशनल स्टार्सनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनीही यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अक्षयनं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या स्टेटमेंटचं समर्थन करत म्हटलं की, शेतकरी आपल्या देशाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यांच्या अडचणींवर शक्य तो प्रत्येक तोडगा काढला जात आहे. या प्रयत्नांचं समर्थन केलं गेलं पाहिजे. जे कुणी विभाजन करत अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे.
https://twitter.com/akshaykumar/status/1356884526815842304?s=20
सेलेब्सला दाखवला आरसा
त्यानं परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानाचं समर्थन केलं आहे ज्यात म्हटलं आहे की, भारत कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या लोकांना आपला अजेंडा चालवू देणार नाही. मंत्रालयाकडून त्या सेलेब्सला कठोर संदेश देण्यात आला आहे जे सतत या संवेदनशिल मुद्द्यावर भाष्य करत आहेत.
अजय-सुनीलनंही केलं समर्थन
अक्षय व्यतिरीक्त अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांनीही यावर ट्विट केलं आहे. दोघांनीही एकजुटीचा संदेश देत स्पष्ट केलं आहे की, बाहेरच्या कुणाच्याही प्रोपोगंडाच्या प्रभावात नाही यायला पाहिजे. अर्धवट सत्य ते कायमच खतरनाक असतं असंही त्यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/ajaydevgn/status/1356892548837502977?s=20
We must always take a comprehensive view of things, as there is nothing more dangerous than half truth. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda @hiteshjain33 https://t.co/7rNZ683ZAU
— Suniel Shetty (@SunielVShetty) February 3, 2021