नागपूर : बहुजननामा ऑनलाइन टीम – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी यासाठी विरोधकांनी आवाज उठवला होता. हिंदू धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर उस्मानी याच्यावर कारवाई केली जात नसल्याने सरकार विरोधात टीका करण्यात येत होती. अखेर शरजिल उस्मानी याच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे गृहमंत्री यांनी यावर बोलताना सांगितले की, शरजिल उस्मानी सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी एक टीम गठीत करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
A case has been registered against Sharjeel Usmani. He is not in Maharashtra and a team has been constituted to catch him: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on Elgar Parishad controversial speech matter pic.twitter.com/SknuHnuSGC
— ANI (@ANI) February 3, 2021
एल्गार परिषदेच्या वादग्रस्त प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री म्हणाले, शरजील उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी एक टीम गठीत करण्यात आली आहे, असे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, आज सकाळी नगापूर येथे बोलताना देशमुख म्हणाले, पुण्यातील एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले किंवा नाही याबाबतचा व्हिडीओ मागवण्यात आला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य तपासले जात असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.
शरजिल उस्मानी विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय युवा जनता मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 30 जानेवारी रोजी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना उस्मानी याने हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती.