नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त खोटं बोलतात. मात्र आम्ही केवळ पूर्ण होतील, अशीच आश्वासनं देत आहोत, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधानांवर जोरदार टीकाही केली
मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र तो फक्त एक विनोद होता. त्यामुळेच आम्ही जाहीरनामा करताना फक्त जे शक्य होऊ शकतं, अशाच गोष्टींवर भर दिला. दरवर्षी गरीब कुटुंबांच्या खात्यात ७२ हजार रुपये जमा करू, असं राहुल गांधींनी म्हणाले. गरिबी पर वार, ७२ लाख ६० हजार रुपये जमा होतील. त्यामुळे पहिल्यांदाच लोकांच्या खिशात थेट पैसा जमा होईल, असं त्यांनी म्हटलं.
देशापुढे बेरोजगारी हि खुप मोठी समस्याअसून मोदींनी केवळ आश्वासने देत २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे सांगितले मात्र त्याचं काहीच झालं नाही. आम्ही २२ लाख सरकारी नोकऱ्या देऊ.सत्तेत आल्यावर मार्च २०२० पर्यंत या जागा भरल्या जातील.
१० लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार दिला जाईल,’ असं राहुल म्हणाले. एखाद्या व्यक्तीला उद्योग सुरू करायचा असल्यास त्याला सध्या विविध विभागांची परवानगी लागते. मात्र काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर तीन वर्षे कोणतीही परवानगी लागणार नाही. तरुणांनी रोजगार निर्माण करावा, आम्ही त्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे उघडू, अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय ज्या मनरेगाची मोदींनी खिल्ली उडवली, त्या मनरेगाच्या अंतर्गत १५० दिवस रोजगार देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.