नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – रिपब्लिकन सेनेच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचावसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ईव्हीएमचे प्रतिकात्मक दहन करून भाजपा सरकार व निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
ईव्हीएमच्या माध्यमातून मतदानाचा हक्क हिरावून घेतल जात असल्याचा आरोप करुन निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशावरून हे धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे यांनी केले. या वेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संघरत्न कुऱ्हे, रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघमारे, संतोष साळवे, अंकुश सावते, सम्राट बनसोडे, गौतमीताई कावळे, भीमराव घुले, रमेश सूर्यवंशी, साहेबराव गजभारे, छगन बुक्तरे, संतोष दुधमल, शंकर थोरात, श्याम निलंगेकर, राजरत्न गजभारे, पंडित ढवळे, पुष्पेंद्र भुरे, विशाल सावंत, नागोराव ढवळे, बाळासाहेब सोनकांबळे, संतोष आगबोटे, रवी चित्ते, विठ्ठल गायकवाड, श्रावण नरबांगे, कनिष्क सोनसळे, सूर्यकांता लोणे, चंद्रकला विनायते, उज्ज्वला खिल्लारे, गिरजाबाई भरणे, सुवर्णा कांबळे, समता झगडे, गयाबाई आवटे, जिजाबाई झिंगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.