बहुजननामा ऑनलाईन : युरोपियन युनियनच्या काही खासदारांनी काश्मीरला भेट दिली, यावेळी या खासदारांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यातील जनतेला शांतता हवी आहे. काश्मिरींला विकास हवा आहे. खासदारांनी सैन्याशी दहशवादासंदर्भात देखील चर्चा केली आहे. भारत शांतताप्रिय देश आहे. दहशतवादाविरूद्ध युरोप भारताबरोबर आहे. आम्ही नाजीवाद समर्थक नाहीत, त्यांची भेट चुकीच्या दृष्टीकोनातून पाहिली जात असल्याचे युरोपियन खासदारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
युरोपियन खासदारांनी सांगितले की, टीम काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी आले आहेत. या पथकाने सैन्यातील लष्कराशी राज्यातील दहशतीबाबत चर्चा केली. दहशतवादाविरूद्धच्या लढाईत युरोप भारताबरोबर आहे. दरम्यान या भेटीचा अहवाल युरोपियन संसदेत सादर करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच टीममधील लोक नाजी प्रेमी नाहीत. ही टीम नाजी लोकांची असते तर त्यामध्ये सहभागी लोकांनी संसदेसाठी निवड केली नसती. वास्तविक, युरोपियन खासदारांची ही भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘जनसंपर्क’ मानली जात आहे. असेही म्हटले जाते की, या प्रतिनिधीमंडळातील बहुतेक लोक राइट-विंगर किंवा सेंटर-राइट विंगर आहेत. खासदारांना नाजीवादी आणि नाजी समर्थकही म्हटले जात आहे. यामुळेच युरोपियन खासदारांच्या पत्रकार परिषदेत या विषयावर स्पष्टीकरण देण्यात आले.
खासदारांनी कलम ३७० बद्दल सांगितले की, हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी शांततेसाठी वाटाघाटी केली पाहिजे. दरम्यान , खासदारांनी पत्रकारांना काश्मीर दौऱ्याबद्दल विचारले असता शिष्टमंडळाने सांगितले की, त्यांना अधिकाधिक लोकांशी बोलण्याची संधी मिळाली नाही. पण काश्मीरला न जाणे, तिथे थोड्या काळासाठी जाणे चांगले.
मंगळवारी युरोपियन खासदार श्रीनगर येथे पोहोचले. खासदारांनी स्थानिक नेते, अधिकारी, सरपंच यांची भेट घेतली. याशिवाय सर्व खासदार श्रीनगरच्या प्रसिद्ध दाल तलावावरही गेले. खासदारांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवर सैन्याशीही चर्चा केली. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेतली.
Visit : Bahujannama.com