मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता संपूर्ण राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु आहे. एकीकडे महायुतीला बहुमत मिळाले असून पुन्हा भाजप- शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. ‘राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो, किंवा मित्र नसतो, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. तसेच सध्या तरी विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितले असून बारामती आणि राष्ट्रवादीचे नातं महाराष्ट्रातील जनतेला अजून कळलं नाही असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
‘बारामती आणि आमचं नातं फार वेगळं आहे. एका कुटुंबाप्रमाणे आम्ही एकमेकांना साथ देत असतो. कितीही अडचणी आल्या तरी बारामतीकर आम्हाला अंतर देत नाहीत. मी १ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल असं म्हंटलं होत , परंतु त्याहून जास्त मतांनी बारामतीकरांनी मला निवडून दिल. त्यामुळे सतत त्यांच्या ऋणांमध्ये राहावंसं वाटत. ‘असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान , विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्षाने राज्यातील आपले स्थान पुन्हा बळकट केल्याचे दिसून येत आहे. पक्षानं ५३ जागा पटकावल्या आहेत. तसेच काँग्रेसलाही ४४ जागांवर यश आलं आहे. दुसरीकडे भाजपच्या जगांत मागील वेळी पेक्षा घट झाल्याने शिवसेना मुख्यमंत्री पदाची मागणी करत आहे. त्यात आता विरोधी पक्षानं ऑफर दिल्यानं शिवसेनेची मागणी वाढून राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं अशी मागणी दिसत आहे.
Visit : Bahujannama.com