बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. यात भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)आणि शिवसेनेकडून सेना नेते खासदार संजय राऊत आघाडीवर असल्याचे दिसून येते. भाजपवर टीका केल्याशिवाय संजय राऊत यांना रात्री झोपदेखील लागत नसल्याचे( raut-cant-sleep-without-
खासदार राऊत यांनी सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणे आणि भाजपविरोधात बोलणे हा गुन्हा आहे, असे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईवरूनही राऊत यांनी ईडीसोबतच भाजपवरही शरसंधान केले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर पलटवार केला आहे. राज्यात कोणतीही घटना घडली तर त्यात केवळ भाजपचा हात असतो, अशा विचारसरणीची ही विरोधक मंडळी आहेत. त्यात राऊत यांना भाजपवर टीका केल्याशिवाय झोपदेखील लागत नसेल. स्वत:चा पराभव समोर दिसू लागला की यांचे टीकास्त्र आपोआप सुरू होते, असे पाटील यांनी म्हटले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये मांडलेले मुद्दे.
– राज्यात काही झाले तरी, पाऊस कमी-जास्त झाला तरी त्यात भाजपचा हात आहे, असे राज्य सरकारला वाटते.
– संजय राऊतांना भाजपवर दिवसभरातून 10 वेळा टीका केल्याशिवाय झोपच लागत नाही.
– मला खरे बोलण्याची आणि वस्तुस्थिती मांडण्याची सवय आहे, स्वप्नात रमण्याची नाही! त्यामुळे मी असे म्हटले की, माझ्यावर वारंवार टीका करून – तुम्हाला शरद पवार मुख्यमंत्री करणार नाहीत, मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर ते सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील.
– राज्य सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही ती आमची संस्कृती नाही.
– एखाद्या यंत्रणेने राज्य सरकार प्रति अनुकूल काम केले तर ते चांगलेपण त्याच यंत्रणेने चौकशी केली आणि त्यांचा त्रास झाला की त्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप राज्य सरकार करत आहे.
– पदवीधर निवडणुकीत पराभव दिसत असल्याने जयंत पाटील यांनी पराभवाची कारणे लिहियला सुरुवात केली आहेत. .