मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – गेल्या दोन दिवसांपासुन ठाणे, पुणे, नाशिक आणि रायगड जिल्हयात जोरदार पाऊस होत असून आगामी 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चारही जिल्हयातील शाळांना उद्या (सोमवार) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्या-त्या जिल्हयाच्या जिल्हाधिकार्यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.
अतिवृष्टीच्या इशार्यामुळं शालेय विद्यार्थ्यांना त्रास होवु नये म्हणून सोमवारी (दि.5 ऑगस्ट) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानूसान दि. 4 ते दि. 6 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी शाळांना सुट्टी जाहिर केली आहे. नाशिक शहर आणि जिल्हयात तसेच त्रंबकेश्वर आणि इगतपुरी भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून मोठया प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. नाशिक जिल्हयातील काही गावात पूर परिस्थिती आहे.
पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे नाशिक जिल्हयातील देखील शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. रायगडमध्ये देखील जोरदार पाऊस पडत असल्याने शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सोमवारी बंद राहणार आहेत. पुण्यातील खडकवासला आणि पानशेत धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासलामधून पाणी सोडण्यात येत असल्याने मुठा नदी ओसांडून वाहत आहे. शहरातील जनीजीवन देखील विस्कळीत झाले आहे.