नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – देशात निवडणुकांचे चार टप्पे संपले असून आज निवडणुकीचा पाचवा टप्पा आहे यामध्ये महत्वाच्या सात राज्यासाठी मतदान होणार आहे .त्यापार्श्वभूमीवर मेवानी यांनी मतदारांना आवाहन केले ते म्हणाले कि ,आज तुमच्या मुलांना अयोध्येला नव्हे, तर ऑक्सफर्डला पाठवणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, पूर्व दिल्ली मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार अतिशी यांच्यासाठी प्रचार करताना मेवाणींनी हे आवाहन केलं. देशात हिंदू-मुस्लिम वाद असाच वाढत ठेवण्यासाठी आणि या मुद्यांवर राजकारण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरीब मुलांना अयोध्येला पाठवायचं आहे, असं मेवाणी म्हणाले.
‘पुढे बोलताना मेवानी म्हणाले कि ,आपल्यालाआपल्या पुढच्या पिढीला कुंभ किंवा अयोध्येला पाठवायचं नाही. तर चांगले शिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात पाठवायचं आहे. जेणे करून मुलांचे चांगले भवितव्य घडेल आणि सक्षम देशासाठी हे गरजेचे आहे . अतिशी यांचं शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झालं आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांना ऑक्सफर्ड, केंब्रिज विद्यापीठांमध्ये पाठवूया,’ असं आवाहन मेवाणींनी केले ते अतिशीं यांच्या प्रचारासाठी ते दिल्लीत आले होते ‘अतिशी यांनी शिक्षण क्षेत्रात एक मॉडेल तयार केलं. तसं मॉडेल गुजरातमध्ये कुठेच दिसत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या गुजरात मॉडेलवर अप्रत्यक्ष रित्या टोला लगावला . अतिशींचा लढा आरएसएसचं समर्थन करणाऱ्या क्रिकेटपटूशी (गौतम गंभीर) आहे. त्यामुळे मतदारांनी अतिशींच्या मागे खंबीरपणे उभं राहावं,’ असं आवाहन त्यांनी केलं. या जागेसाठी १२ मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.