बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची मागणी वाढणार आहे. आगामी काळात दिवाळीच्या ( Diwali) सणात फटाक्यांची मागणी वाढणार आहे. मात्र, त्याआधी दिवाळीपूर्वी(Diwali) मध्यप्रदेश सरकारने ( Madhya Pradesh) एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Sivraj Singh Chauhan) यांनी राज्यात चीनी आणि अन्य परदेशी फटक्यांची साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर चिनी वस्तूंच्या आयातीवर देखील बंदी घातली आहे. त्याचबरोबर चीनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या आयातीसाठी कोणतेही परवाने देण्यात आलेले नाहीत असं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात मध्यप्रदेश सरकारचे अपर मुख्य सचिव (गृह) डॉ. राजेश राजौर( Dr. Rajesh Rajaur) यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. यामध्ये चिनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या विक्रीवर, वाहतुकीवर आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन केल्यास यासाठी २ वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते.
आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचं केलं आवाहन
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यासंदर्भात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चीनी फटाके आणि त्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्य़ाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा वापर केल्यास संबंधितांवर ‘एक्स्प्लोसिव्ह अॅक्ट’अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचं देखील त्यांनी आवाहन केलं. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
राजस्थानात फटाक्यांची विक्री अन् आतिशबाजीवर बंदी
मध्यप्रदेशाबरोबरच राजस्थानमध्ये देखील अशोक गेहलोत सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी, फटाक्यांच्या विषारी धुरापासून कोरोना संक्रमितांच्या संरक्षणासाठी संपूर्ण राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घातली आहे. त्यामुळे या दिवाळीत नागरिकांना फटाके वाजवता येणार नाहीत.
फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण ( Pollution) कोरोनाग्रस्तांसाठी ठरू शकतं घातक, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
दिवाळीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्याचबरोबर सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने कोरोनाग्रस्त तसेच विविध आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो. फटाक्यांमुळे होणारा धूर आणि प्रदूषण हे सर्वसामान्यांसह, कोरोनाग्रस्तांना किंवा कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींसाठीही घातक ठरू शकतं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये देखील यासंदर्भात काही निर्णय होतात, की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.