नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील वाढत्या मॉब लिंचिंग घटनांमध्ये जात असलेल्या बळींमुळे देशातील विविध क्षेत्रातील 49 लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये देशातील वंशवाद आणि जातीय, धार्मिक हिंसेमुळे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रामुळे आता वाद होताना दिसत आहे. या पत्रात अनेक मोठ्या व्यक्तिंचे नाव आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचेही या पत्रात नाव आहे. दरम्यान मणिरत्नमच्या टीमने मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. मणिरत्नम यांनी अशा कोणत्याही पत्रावर हस्ताक्षर केलेले नाही असे टीमचे म्हणणे आहे. याशिवाय मणिरत्नम सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे असेही टीमचे म्हणणे आहे. टीमनुसार, अशा कोणत्याही पत्रावर हस्ताक्षर असणे तर दूरच परंतु असे कोणते पत्र सपोर्टसाठीही त्यांच्याकडे आलेले नाही.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात साहित्य, सिनेमा, इतिहास आणि कला क्षेत्रातील 49 लोकांची हस्ताक्षरे आहेत. यात अदूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांसारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे. आता मणिरत्नम यांच्या नकारानंतर या पत्रामुळे वाद होऊ शकतो.
मोदींना लिहिलेल्या पत्रात काय आहे नेमकं ?
सर्व व्यक्तींनी नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे की, मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा आणि आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी. पत्रात लिहिण्यात आलं आहे की, आपलं संविधान भारताला धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगत आहे. जेथे प्रत्येक धर्म, समूह, लिंग जात असलेल्या लोकांना समान अधिकार आहे. या पत्रात अशी मागणी करण्यात आली आहे की, “दलित, मुसलमान आणि इतर अल्पसंख्यकांच्या लिंचिंगला आळा घालण्यात यावा.