बहुजननामा ऑनलाईन टीम : विधानसभेचा निकाल लागून १४ दिवस झाले असले तरीही राज्यात अद्याप स्थिर सरकार स्थापन झाले नाही. परंतु आता सत्तास्थापनेच्या ह्या तिढ्याला पूर्णविराम देणार आहे. यंदासुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारच राज्यात सत्ता स्थापन करणार यावर अमित शहा यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उच्चस्तरीय बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यात सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना आता भाजपमधून वेग आला आहे.
राज्यात सत्ता स्थापनेविषयी शिवसेनेसोबत एकमत होत नसल्याने अखेर केंद्रातून हा शेवटचा निकाल जाहीर करण्यात आला. दिल्लीत कॅबिनेट बैठकीदरम्यान, मोदी आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान निवडणूक प्रचारादरम्यानच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे चेहरे असतील असे भाजपने स्पष्ट केले होते. पण विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने भूमिका बदलत मुख्यमंत्रीपदाचा दावा केल्याने सर्व समीकरण बदलली गेली.
गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेला हा वाद सोडविण्यासाठी आरएसएसला मध्यस्थी घ्यावी लागली. त्यात आता फडणवीस यांच्याबरोबर नितीन गडकरी यांचे नावदेखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत समोर आलं होत. मात्र, मोदी आणि शहानी यासंदर्भात देखील शेवटचा निर्णय जाहीर केला आहे. इतक्या दिवसांपासून रखडलेल्या सरकार स्थापनेच्या निर्णयासंदर्भात अंतिम निर्णय देण्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच तीव्र हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील गुरुवारी सकाळी राज्यपालांची भेट घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजप सरकार बनवण्याचा दावा या बैठकीत करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Visit : bahujannama.com